Headlines

तुकाराम मुंढेंच्या आदेशाने धुळ्यात कारवाई!सोनगीर नजीक पहाटे लाखोंचा गुटखा जप्त

धुळे,दि.०४ (विशेष प्रतिनिधी)मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर टोल नाका परिसरात आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने पकडलेल्या संशयीत वाहनातून राज्यात प्रतिबंधित साडे अठरा लाख रुपयांचा विमल पान मसाला व व्ही वन तंबाखू साठा जप्त करण्यात आला.दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धुळे जिल्ह्यातील अवैध व्यापाराविरूध्द मोहीम…

Read More

अकरावी प्रवेश -पहिला पसंतीक्रम नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत लगेच संधी मिळणार !

अकरावी प्रवेश महत्वाचा निर्णय – मुंबई , दि. ०६ (द नरिमन पॉईंट )यापूर्वी प्रथम पसंतीक्रम दिलेले महाविद्यालय विद्यार्थ्याला अलॉट झाल्यास विद्यार्थ्याला त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य अर्थात बंधनकारक होते परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार एखाद्या विद्यार्थ्यास पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट होऊनही तो ते नाकारू शकेल.तसेच पहिला पसंतीक्रम नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत…

Read More

नंदुरबारात स्टेट बँकेच्या शाखेत अचानक गोळीबाराच्या आवाजाने सारेच बिथरले !

नंदुरबार,दि.०३(द नरिमन पॉईंट )नंदुरबारात भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत ग्राहकांची वर्दळ असतांना अचानक गोळीबाराच्या आवाजाने सारेच बिथरले .दरम्यान यामुळे एकच खळबळ उडाली.काही काळ भीतीपोटी जीव मुठीत घेऊन ग्राहकांनी पळापळ सुरु केली . बँकेत गोळीबार झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि मग पोलिस प्रशासनाची देखील एकच खळबळ धावपळ उडाली ! याबाबत माहिती अशी कि , नंदुरबार शहरातील…

Read More

शाळा १५ जून पासूनच उघडणार, ॲानलाईन नव्हे ॲाफलाईनच !

पुणे,दि.(द नरिमन पॅाईंट) यंदाही नविन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासूनच पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन पद्धतीनेच सुरू करण्यात येणार आहे. यात कोणताही बदल करण्यासंदर्भातील कोणतेही निर्देश अद्याप दिलेले नाहीत. शाळा ऑनलाईन घेण्याचे किंवा उशिरा सुरू करण्याचे सध्या तरी कोणतेही नियोजन नाही,अशी माहिती प्राथमिक संचालनालयाचे शिक्षण संचालक श्री शरद गोसावी,यांनी दिली आहे. देशातील युद्धजन्य परीस्थितीमुळे अथवा पंतप्रधानांनी केलेल्या आवाहन…

Read More

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी पणनमंत्री जयकुमार रावल

मुंबई ,दि.३(द नरिमन पॉईंट) केंद्र सरकारच्या ‘मॉडेल ॲक्ट’च्या तरतुदींनुसार मुंबई एपीएमसीला नुकताच ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ म्हणून दर्जा देण्यात आल्याने नवी मुंबई एपीएमसीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले,या कायद्यानुसार, महाराष्ट्रातील सर्व ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारपेठांचे’ अध्यक्षपद आता पणन मंत्र्यांकडे असणार आहे.त्यामुळे राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती’चे अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.आशियातील महत्त्वाच्या कृषी…

Read More

धुळे व जळगाव आगारातील बस बारडोलीजवळ एकमेकांना धडकल्या ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

नवापूर -सुरतहून धुळ्यास जाणाऱ्या एसटी बसला ट्रॅक्टरची धडक बसल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यात बस डिव्हायडरवर धडकली ;त्याच वेळी पलीकडील मार्गावरून धावणाऱ्या जळगाव-सुरत बसला धुळे-सुरत बसची धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की धुळे-सुरत बस दोनवेळा उलटली आणि क्षणातच बसने पेट घेतला या आगीत ७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे…

Read More

शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी!

५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा मुंबई दि.०२ (द नरिमन पॅाईंट) शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. त्यामुळे राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे…

Read More

ज्या ग्रामपंचायतीत आरक्षण ५० पेक्षा जास्त तेथे ओबीसी जागांमध्ये कपात

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निर्णय प्रक्रिया मुंबई,दि.(द नरिमन पॅाईंट)ज्या ग्रामपंचायतींमध्ये एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत आहे, तेथे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ओबीसी जागांमध्ये आवश्यक कपात करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जारी केले आहेत.त्यामुळे नव्याने प्रभाग रचना करण्याचे नियोजन होत आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार ५० टक्के पेक्षा अधिक आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत न्यायालयाने स्थगीती दिल्याने…

Read More

आयपीएल संघाच्या बसला अचानक आग !

गुजरात टायटन्सच्या संघावर आणखी एक संकट ! मुंबई दि.०१(द नरिमन पॉईंट)रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का पचवत नाही तोपर्यंत अंतिम सामना संपल्यानंतर हॉटेलकडे परतत असताना गुजरात टायटन्सच्या संघाला दुसऱ्या संकटाला सामोरे जावे लागले ;सामना संपल्यानंतर हॉटेलकडे परतत असताना संघाच्या बसला अचानक आग लागली सुदैवाने, वेळेत खबरदारी घेतल्यामुळे शुबमन गिलसह सर्व खेळाडू आणि सपोर्ट…

Read More

मुंबईत दहशतवादी हल्याचा कट दिल्ली विशेष पोलिसांकडून उघड ?

महत्त्वाच्या ठिकाणी अंधाधुंद गोळीबार वतसेच पोलिस आणि सुरक्षा दल होते टार्गेटवर वांद्रेतील गरीब नगर कारवाईचा बदल्यासाठी कट मुंबई दि. ०१(द नरिमन पॉईंट )मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी अंधाधुंद गोळीबार तसेच पोलिस आणि सुरक्षा दलांना टार्गेटवर ठेऊन हल्ले करण्याचा अर्थात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे .प्रथमदर्शनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, दाऊद…

Read More